
खानापूर, ता. 6 : जळगे गावाने सीमाप्रश्नी मोठे योगदान दिले आहे. जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही, तोपर्यंत दिवाळीची आरती ओवाळून घेणार नाही, अशी प्रतिज्ञा केली आहे. त्यामुळे विनाविलंब हा प्रश्न सुटावा. यासाठी गेल्या 67 वर्षांपासून आम्ही समितीच्या पाठिशी उभे असून यावेळी समितीने आमच्याच गावाचा आमदार करण्याची संधी दिल्याने १०० टक्के मतदान करू, असा निर्धार जळगे गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे,
खानापूर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांची शनिवारी (ता.6) जळगे येथे पदयात्रा काढून घरोघरी प्रचार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या सभेत ग्रामस्थांनी 100% मतदान करण्याचा निर्धार जळगे गावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केला,
यावेळी समितीचे उमेदवार श्री. मुरलीधर पाटील यांनी निवडून देण्याचे आवाहन केले. प्रचार सभेत समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, आबासाहेब दळवी, शामराव पाटील, तसेच तालुक्यातील समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता,
यावेळी जळगे गावातील सुभाष शिवणगेकर, पुंडलिक शिवणगेकर, राजू शिवणगेकर, महादेव निकलकर, दीपक गुरव, नारायण निकलकर, अरुण शिवणगेकर, मल्हारी तोपिनकट्टी, नारायण निलजकर, भरमा निलजकर, विलास निलजकर, सुनील लाड, प्रिया लाड, पुंडलिक निलजकर, नागेश पाटील, मालोजी पाटील, लक्ष्मण नंद्याळकर, मनोहर नंद्याळकर, चंद्रकांत पाटील, श्रीकांत पाटील, व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते,
