
सिमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना म ए समितीतर्फे खानापूर व बेळगाव येथे अभिवादन करण्यात आले.
खानापूर ; 17 जानेवारी 1956 रोजी झालेल्या सीमा आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बेळगाव आणि निपाणी येथे आंदोलकांनी हौतात्म्य पत्करले. सिमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दोन मिनिटे मौन पाळून अभिवादन करण्यात आले.
शहरातील प्रमुख मार्गावरून मुक फेरी काढण्यात आली. मुक फेरीत मराठी भाषिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुक फेरीची सांगता झाल्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हुतात्मा चौक येथील अभिवादन कार्यक्रम झाल्यावर कंग्राळी, हिंडलगा येथे देखील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर यांच्या वतीने अभिवादन.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने, खानापूर येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर म ए समीतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले. यावेळी जेष्ठ नेते माजी आमदार दिगंबर पाटील, समीतीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, जगन्नाथ बीर्जे, बाळाराम शेलार, आदीजण उपस्थित होते.
