कोल्हापुरात जपून ठेवल्या आहेत शिवाजी महाराजांच्या अस्थी… आजही शिवभक्त घेतात दर्शन!
तुम्हाला जर म्हटलं की या अस्थी आजही जपून ठेवण्यात आल्या आहेत ? तर.. तर आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. कोल्हापुरात आजही महाराजांच्या अस्थी जपून ठेवण्यात आल्या आहेत. अनेक शिवभक्त आजही या अस्थींच दर्शन घेऊ शकतात.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं दैवत. अशा या दैवताने 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजाराम महाराजांनी महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. तसेच त्यांच्या शिवरक्षा व अस्थी रायगडावरील जगदीश्वर मंदिराजवळ पुरण्यात आल्या. या घटनेला आता जवळपास 345 वर्षे उलटली आहेत. पण, तुम्हाला जर म्हटलं की या अस्थी आजही जपून ठेवण्यात आल्या आहेत ? तर.. तर आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. कोल्हापुरात आजही महाराजांच्या अस्थी जपून ठेवण्यात आल्या आहेत. अनेक शिवभक्त आजही या अस्थींच दर्शन घेऊ शकतात.

महात्मा फुले आणि टिळकांचा पुढाकार…
1890 च्या दशकात महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचा शोध लावला. त्यानंतर त्यांनी या समाधीच्या जिर्णोद्धाराची घोषणा केली. त्यासाठी जनजागृती मोहीम सुरू करत निधी गोळा करण्यात आला. याच काळात, 1895 मध्ये लोकमान्य टिळक यांनी शिवजयंती सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि समाधीच्या जिर्णोद्धाराला गती मिळाली. यावेळी कोल्हापूर संस्थानने जीर्णोद्धाराची जबाबदारी घेण्याचं जाहीर केलं. पण टिळकांनी हा प्रस्ताव फेटाळला.

जिर्णोद्धाराचे काम सुरू…
यावेळी टिळकांनी ठामपणे सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त त्यांच्या वंशजांचे नाहीत, तर संपूर्ण समाजाचे आहेत. त्यामुळे समाधीचा जिर्णोद्धार लोकवर्गणीतूनच व्हावा”. टिळकांच्या आग्रहामुळे संस्थानने माघार घेतली. त्यानंतर रायगड स्मारक समिती आणि ब्रिटिश सरकारच्या सहकार्याने जिर्णोद्धाराचे काम सुरू झाले.
शिवरक्षा आढळून आल्या….
रायगड तेव्हा कुलाबा जिल्ह्याचा भाग होता. या कामाची देखरेख कुलाब्याच्या चीफ इंजिनीअरने केली. हे काम बाळकृष्ण मोरेश्वर सुळे उर्फ तात्यासाहेब सुळे या कंत्राटदाराला देण्यात आले. 1926 मध्ये जिर्णोद्धाराचे काम प्रत्यक्ष सुरू झाले. त्यावेळी सुमारे सहा फूट खोल खणल्यानंतर एका दगडी पेटीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्थी आणि रक्षा आढळून आल्या.
अन् रक्षेचा काही भाग काढून घेतला…
ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी हादरवून टाकणारी होती. तिथे उपस्थित असलेल्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने याची माहिती कुलाब्याच्या वरिष्ठांना पत्राद्वारे कळवली. या पवित्र रक्षेची बातमी पसरताच, संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाची लाट उसळली. कंत्राटदार तात्यासाहेब सुळे यांनी या रक्षेचा काही भाग काढून घेतला, तर महादेव वडके यांनीही रक्षेचा काही भाग जपून ठेवला.
इथे आजही आहेत शिवरक्षा….
याशिवाय कोल्हापूरच्या राजवाड्यात शिवरक्षेचा काही भाग पाठवण्यात आला. कोल्हापूरच्या छत्रपतींनी यासंदर्भात लिहिलेलं पत्र आजही उपलब्ध आहे. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्थींचा शोध हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. या घटनेने शिवरायांवरील लोकांची अधिक दृढ झाली. त्यांच्या रक्षेचा काही भाग आजही कोल्हापुरातील राजवाड्यात जपून ठेवण्यात आला आहे. अनेक शिवभक्त त्याचं दर्शन घेऊ शकतात.
ಕೊಲ್ಹಾಪುರದಲ್ಲಿ ಇಂದಿಗೂ ಸಂರಕ್ಷಿಸಲಾಗಿವೆ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಅಸ್ಥಿಗಳು!
ಕೊಲ್ಹಾಪುರ (ವರದಿಗಾರ):
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ದೈವ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಅಸ್ಥಿಗಳು ಇಂದಿಗೂ ಕೊಲ್ಹಾಪುರದಲ್ಲಿ ಸಂರಕ್ಷಿಸಲಾಗಿವೆ ಎಂಬುದು ಅನೇಕರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯದ ಸಂಗತಿಯೇ ಸರಿ, ಆದರೆ ಇದು ನಿಜ. ಇಂದಿಗೂ ಅನೇಕ ಶಿವಭಕ್ತರು ಈ ಪವಿತ್ರ ರಕ್ಷೆಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಕೊಲ್ಹಾಪುರದ ರಾಜಮನೆತನದ ಕಡೆಗೆ ಬರುತ್ತಾರೆ.
ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು 1680ರ ಏಪ್ರಿಲ್ 3ರಂದು ರೈಗಡದಲ್ಲಿ ಅಂತಿಮ ಶ್ವಾಸ ತಾಳಿದರು. ಬಳಿಕ ಅವರ ಪಾರ್ಥಿವಕ್ಕೆ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ನಡೆಸಲಾಯಿತು ಹಾಗೂ ಜಗದೀಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ಬಳಿ ಅಸ್ಥಿ ಮತ್ತು ಶಿವರಕ್ಷೆ ಸಮಾಧಿ ಮಾಡಲಾಯಿತು. ಈ ಘಟನೆಗೆ 345 ವರ್ಷಗಳು ಕಳೆದರೂ ಅವರ ಕೆಲವು ಅವಶೇಷಗಳು ಇಂದಿಗೂ ಸಂರಕ್ಷಿತವಾಗಿವೆ.
ಮಹಾತ್ಮ ಫುಲೆ ಮತ್ತು ಲೋಕಮಾನ್ಯ ಟಿಳಕರ ಮುಂದಾಳತ್ವ…
1890ರ ದಶಕದಲ್ಲಿ ಮಹಾತ್ಮ ಫುಲೆ ಅವರು ರೈಗಡದ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿಯನ್ನು ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಿದರು. ನಂತರ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ಕಾರ್ಯ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. 1895ರಲ್ಲಿ ಲೋಕಮಾನ್ಯ ಟಿಳಕರು ಶಿವಜಯಂತಿ ಪ್ರಾರಂಭಿಸಿ ಸಮಾಧಿಯ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರಕ್ಕೆ ವೇಗ ನೀಡಿದರು. ಟಿಳಕರು ದೃಢವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದು ಹೀಗೆ: “ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಕೇವಲ ಅವರ ವಂಶಜರವರಿಗಷ್ಟೇ ಸೇರಿದವರಲ್ಲ, ಅವರು ಸಂಪೂರ್ಣ ಸಮಾಜದವರಾಗಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಸಮಾಧಿಯ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಸಹಕಾರದಿಂದಲೇ ಆಗಬೇಕು.”
ಅಸ್ಥಿ ಮತ್ತು ರಕ್ಷೆಯ ಪತ್ತೆ…
1926ರಲ್ಲಿ ರೈಗಡದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ಕೆಲಸ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದಾಗ ಆರು ಅಡಿ ಆಳದಲ್ಲಿ ತೋಡಿದಾಗ ಕಲ್ಲಿನ ಪೆಟ್ಟಿಗೆಯಲ್ಲಿ ಮಹಾರಾಜರ ಅಸ್ಥಿ ಮತ್ತು ರಕ್ಷೆಯ ಕೆಲವು ಭಾಗ ಪತ್ತೆಯಾಯಿತು. ಈ ಘಟನೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೆಲ್ಲೆಡೆ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಉತ್ಸಾಹದ ಅಲೆ ಎಬ್ಬಿಸಿತು. ಗುತ್ತಿಗೆದಾರ ತಾತ್ಯಾ ಸಾಹೇಬ್ ಹಾಗೂ ಮಹಾದೇವ ವಡಕೆ ಅವರು ಈ ಪವಿತ್ರ ರಕ್ಷೆಯ ಕೆಲವು ಭಾಗವನ್ನು ಸಂರಕ್ಷಿಸಿದರು.
ಇಂದಿಗೂ ಕೊಲ್ಹಾಪುರದಲ್ಲಿ ದರ್ಶನ…
ಈ ರಕ್ಷೆಯ ಕೆಲವು ಭಾಗಗಳನ್ನು ಕೊಲ್ಹಾಪುರದ ರಾಜಮನೆಗೆ ತರಲಾಯಿತು. ಅದರ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಪತ್ರವ್ಯವಹಾರ ಇಂದಿಗೂ ಲಭ್ಯವಿದೆ. ಇಂದಿಗೂ ಅನೇಕ ಶಿವಭಕ್ತರು ಮಹಾರಾಜರ ರಕ್ಷೆಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ರಾಜಮನೆಗೆ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ.
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿನ ಈ ಘಟನೆ ಶಿವಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆಗೆ ಬಲ ನೀಡುವಂತಾಗಿದೆ. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಇಂದಿಗೂ ಜನರ ಹೃದಯಗಳಲ್ಲಿ ಜೀವಂತ ದೈವವಾಗಿ ಆರಾಧಿಸಲ್ಪಡುತ್ತಿದ್ದಾರೆ.

